नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा रेशनवरील तांदूळ घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले असून याची व्याप्ती पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत गेली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हे पण वाचा: कोकणात शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ
हे पण वाचा: भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करा – डॉ. अनिल बोंडे
पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेद्वारे मिळाणाऱ्या तांदळात घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. या घोटाळ्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहेत, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. तसंच, या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. जर या घोटाळ्याची चौकशी झाली तर अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हे पण वाचा: नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन, भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
हे पण वाचा:
ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना सहकार खात्याची भीती
केंद्राच्या नव्या सहकार खात्याबाबत विरोध केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना सहकार खात्याची भीती, असं म्हणाले. ज्यांनी सहकार चळवळीत चुकीचं काम केलं. सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती आहे. मात्र, ज्यांनी सहकार श्रेत्रात चांगलं काम केलं, त्यांनी या नव्या खात्याचं स्वागतच केल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री अमित शाह हे खूप आधीपासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.