मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा मुद्दा भाजपने निवडणुकीच्या पुर्वी मार्गी लावला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने राम मंदिराचा मुद्दा प्रचारात आणला. परंतु त्यांचा त्यांना पाहिजे तसा फायदा झाला नाही. स्वत: अयोध्या मधील भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. यावरून आता शरद पवारांनी भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी
देशातील लोक मोदी सरकारने प्रश्न जे काढले, त्या प्रश्नांना फारसे लोक महत्व देत नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, तर लोकांच्याच चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्वाचा होईल. मंदिर बांधलं ? त्याचा आनंद आहे. परंतु उद्या मी आयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन. त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन. पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी”
तसेच राम मंदिराचा राजकारणासाठी मोदींनी वापर केला. त्याची नोंद अयोध्येतील जनतेने घेतली. राम मंदिराचे स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता, त्याचा १०० टक्के पराभव अयोध्येतील जनतेने केला. हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे त्याचा फारसा विचार करायचा नाही. असेही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली
हेही वाचा…“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल”
हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी