अहमदनगर : किमान हमीभावाचे बंधन असतानाही, कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल किमान हमीभावाने (MSP) खरेदी केला जात नाही. ही शेतकऱ्यांची उघड उघड लूट आहे. सध्या मका हे पीक शेतकरी बाजारात आणत आहे.
त्यातही मोठ्या प्रमाणावर लूट चालू आहे. MSP 1850 असताना वेगवेगळी कारणे दाखवून कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि बाहेरही व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. बाराशे, तेराशे रुपयांनी मक्याची खरेदी केली जात आहे. अशा स्थितीत हमीभावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी झाली नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अस इशारा युवक क्रांती दलाच्या वतीने देण्यात आला आहे.
किंमती पेक्षा कमी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत तसेच प्रांत अधिकाऱ्यांना युवक क्रांती दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले. अगोदरच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला लॉकडाऊनमुळे कमी भाव मिळत आहे. त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
आणि वरून शेतकऱ्यांवर या व्यापाऱ्यांचे सुलतानी संकट येत आहे. निवेदनावर युवक क्रांती दलाचे राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे, पुणे शहराध्यक्ष कमलाकर शेटे, राशीनचे शराध्यक्ष विनोद सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी देशमुख, मिरजगावचे सलीम आतार, सागर मदने, योगेश खोसे यांच्या सह्या होत्या.
Read Also :
भक्तांसाठी खुशखबर; दिवाळीनंतर सुरू होणार धार्मिक स्थळं, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती https://t.co/ayGGs64pSd @rajeshtope11 @NCPspeaks @BhatkhalkarA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020