मुंबई : महायुतीच्या उमेदवारांसाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरीत जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांची कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली. त्यानंतर त्यांनी मुंबईत भव्य असा रोड शो केला. यातच एक दिवस आधी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून अनेक लोकांचा जीव गेला. त्याच रस्त्यावरून मोदींनी रोड शो केला. त्यावरून विरोधकांनी जोरदार टिका केली. यातच आता ज्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. त्यांच्यावर भ्रष्ट्चाराचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून शरद पवार गटाने भाजपला चांगलचं सुनावलं आहे.
हेही वाचा..“राज ठाकरेंचं महाराष्ट्रात स्थान काय ?” शरद पवारांनी दोन वाक्यात विषय संपवला
दिंडोरी आणि कल्याण येथील जाहीर सभा पार पडल्यानंतर काल नरेंद्र मोदी यांनी मुंबईत भव्य रोड शो घेतला. यावरून शरद पवार गटाने भाजपवर गंभीर आरोप केले आहे. यातच मुंबई दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहे.
तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील महानगरपालिकेत १००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर वायव्य मुंबईत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यावर मातोश्री क्लब हॉटेल प्रकरणी ५०० कोटींचा आरोप आहे. या उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये म्हणूनच मोदी यांनी सभा न घेता फक्त रोड शोच केला आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे.
हेही वाचा…“थोडी तरी कदर बाळगा”, मोदींच्या डोक्यावर जिरेटोप, शरद पवार गटाने पटेलांना झापलं
दरम्यान, काल नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शो वरून विरोधकांनी सडकून टिका केली. मोदींच्या या रोड शोमुळे मेट्रो आणि ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सांयकाळी निघणाऱ्या चाकरमान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. तर अनेक स्टेशनवर चेंगराचेंगरीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. यावरून अनेक नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर संताप व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा..शांतिगिरी महाराजांचा प्रचारासाठी नवा फंडा, नाशकात सायकलवरून केला प्रचार
हेही वाचा…‘घासून नाय ठासून हानली’, पुण्यापाठोपात मावळातही लागले मविआ उमेदवाराच्या विजयाचे बॅनर
हेही वाचा…“पैसा फेको अन् तमाशा देखो हाच त्यांचा जाहिरनामा”, शिंदेंना डिवचलं