औरंगाबाद : ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने भारत – ब्रिटनमधील विमानसेवा तूर्त बंद करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. याच पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईनचा निर्णय घेतानाच राज्यातील महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आला आहे.
मात्र रात्रीच्या संचारबंदीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पुन्हा एकदा मुर्खपणाचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत, त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Once again night curfew imposed in Maharashtra! Once again I ask the same question: has the virus told the Govt that it will be sleeping during the day and will be out only during night! Stupid n idiotic decision yet again.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) December 21, 2020
जलील यांनी ट्विट केले की, कोरोना व्हायरसनेने सरकारला सांगितले का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल ? पुन्हा एकदा मुर्खपणाचा निर्णय.
सोबतच, ख्रिसमसच्या निमित्ताने मध्यरात्रीनंतरही चर्च खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी देखील जलील यांनी केली आहे.