मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटीची वसुली करण्याचे सांगितले होते. त्यांच्या या आरोपानंतर अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांवर सीबीआयचा फास आणखीनच घट्ट होत चालला आहे. सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. देशमुखांच्या घरासह जवळपास १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापायला लागले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी आणि मंत्र्यांनी अनिल देशमुख यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आता अनिल देशमुख प्रकरणावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. न्यायालयाला आव्यश्यक वाटले म्हणून त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश दिलेला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाहीये. तुमचे हात जर साफ असतील तर तुम्ही या प्रकरणातून आरामात सुटून जातात मात्र जर तुमचे हात या प्रकरणात बरबटलेले असतील तर तुम्ही १००% पकडले जाल. या देशात न्यायव्यवस्था आहे. या देशात लोकशाही आहे. न्यायव्यवस्थे मधेच हे प्रकरण चालू आहे. राष्ट्रवादीला त्यांच्या बाकीच्या नेत्यांची चिंता आहे. जर अनिल देशमुखांचा फास आवळला तर लांब पर्यंत जाईल आणि अनेक नावे समोर येतील त्यामुळे ते विस्कटलेले आहेत.
पश्चिम बंगाल नंतर आपलं महाराष्ट्र राज्य असं आहे कि इथं येऊन तपास करण्यासाठी केंद्रीय पथकांना अथवा संस्थांना परवानगी घ्यावी लागते. आता जर न्यायालयालाच वाटते चौकशी करावी त्यात भारतीय जनता पक्ष काहीच करू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर काही भारतीय जनता पक्षाचा हात नाहीये अथवा नसतोच. अत्यंत मूर्ख आरोप महाविकास आघाडी करून केले जात आहे. परंतु अनिल देशमुख हा विषय नाहीये तर त्यात अनेक नावे समोर येणार आहेत हे नक्की आहे. जयंत पाटील यांनी काही आरोप केले होते त्यावर निलेश राणे म्हटले कि जयंत पाटील तुम्ही काय वॉचमन आहात का देशमुखांच्या घरचे असे देखील ते म्हटले आहे. जयंत पाटील यांनी अत्यंत हुशारीने बोलावे मुर्खासारखे काहीहि बोलू नये असा टोला देखील निलेश राणे यांनी मारला आहे.