पुणे : एकीकडे कोरोनाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मारहाण, धाक दाखवून भरदिवसा लुबाडणे, महिलांची छेडछाड करणे ही तर फॅशनच झाली आहे. अशावेळी पोलिस प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी समोरे येणे गरजेचे आहे. परंतू, पोलिस दलातील महिलांवर होणारे अत्याचार आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांच्या प्रसिद्धीच्या हव्यापोटी सर्वसामान्य महिलांनी कोणाकडे दाद मागवी?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चित्रा वाघ यांच्या पक्षांतरामुळे रुपाली चाकणकरांना राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष पद भेटले खरे. परंतू, आपल्यावर पदाची एवढी मोठी जबाबदारी असताना केवळ महिलांच्या न्यासाठी लढा देणे नाहीतर सर्वसामान्य महिलांच्या न्यासाठी झटणाऱ्या चित्रा वाघ यांच्या कुंकवाची संस्कृती काढण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ २०१९ पुर्वी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची भुरळा सांभाळत होत्या. परंतू, २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रिक्त झालेल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. अशावेळी हे पद आपल्यालाच मिळावे, यासाठी रुपाली चाकणकर पक्षश्रेष्ठी खासदार सुप्रिया सुळेंच्या यांच्याकडे ठाण मांडून होत्या. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची गळ्यात माळ बांधली. आपल्यावर एवढ्या मोठ्या पदाची भुरळा सोपवली खरी मात्र, चाकणकरांना आपले अस्तित्व कसे सिद्ध करावे?, याचे ताळतंत्र जमेना झाले. अशावेळी महिलांच्या न्यासाठी लढण्याऐवजी भाजपच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा असलेल्या तथा महिलांसाठी धडपडणाऱ्या चित्रा वाघ यांची बदनामी करून स्वत:ची प्रसिद्धी मिळवायची, असा पायंडाच पाडल्याचे चित्र आहे. कालच्या ट्विटमध्ये तर चाकणकरांनी सिमाच ओलांडली. फेब्रुवारी महिन्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला होता. हाच धागा पकडत, “ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी”, अशा खालच्या पातळीला जावून केवळ प्रसिद्धीसाठी स्वत:ची किंमत दाखवण्याचा चाकणकरांनी केलाला प्रयत्न अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे, चाकणकरांना भारतीय संस्कृतीचा विसर पडला आहे का, एक महिला असताना दुसऱ्या महिलेची ईज्जत काढणे चाकणरांना शोभते का?, कुठे त्या चित्रा वाघ आणि कुठे ह्या चाकणकर? अशा संतप्त प्रतिक्रीया नागरिक करताना दिसून येत आहे.
दरम्यान, महिला संरक्षणाच्या बाबतीत रक्षकच आज भक्षक बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रक्षण करणाऱ्या महिला दलातील पोलिसच अत्याचाराच्या बळी ठरतायंत. उदाहरण घ्यायचे झाले तर अवघ्या काही दिवसांपुर्वी वाशिम येथील महिला पोलिस निरिक्षकांवर नांदेडच्या पोलिस निरिक्षकाने अत्याचार केला. सोलापूरात महिला पोलिस निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंबईमधील महिला अत्याचारातील आरोपीवर गुन्हा दाखल झाला. त्याचबरोबर नागपुरसह महाराष्ट्रातील अनेक अशी उदाहरणे आहेत. त्यामुळे, जर रक्षकच भक्षक बनायला लागले तर सर्वसामान्य महिलांनी जायचे कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी भाजपच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या प्रकरणांचा पाठलाग करत असताना महिलांच्या न्यायासाठी अवघा महाराष्ट्र पायाखाली पिंजून काढला. शिवाय त्यांनी काल गृहमंत्री दिलिप वळसे पाटलांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी……
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 4, 2021
सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्योराप करणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक भाग आहे. परंतू, एवढ्या खालच्या भाषेत महिलांवर आरोप करणे, हे महाराष्ट्रातील जनतेने पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे, एवढ्या खालच्या भाषेतील टीकांमुळे महिलांच्या अस्तित्वाला ठेच पोहचली आहे, हे नक्की.
चित्रा वाघ यांची प्रेसकाँन्फरन्स अन् राठोडांचा राजीनामा
बीडची राहणारी पुजा चव्हाण हिने काही महिन्यांपुर्वी पुण्यात आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. विशेषत म्हणजे, यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोडांचा मोठा हात असल्याचे मानले जात होते. अशावेळी मुख्यमंत्री किंवा महिला प्रदेशाध्यांनी आवाज उठवणे गरजेचे होते. मात्र राठोडांचा राजीनामा घेवून त्यांना शिक्षा करणे तर सोडा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांमधून कोणी तोंडातून शब्द बाहेर काढायला तयार नव्हते. याप्रकरणाचा पाठलाग करत चित्रा वाघ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून संघ्याकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेवून रितसर प्रकरण मांडले. आणि याचाच परिणाम म्हणावा तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या दिवसी सकाळी संजय राठोड यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला.
चित्रा वाघ यांनी पुजा चव्हाण प्रकरणाचा पाठलाग करून तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शिवाय महिला अत्याचाराच्या विषयाला धरून चित्रा वाघ महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात फिरत असतात. अशावेळी रुपाली चाकणरांनी पदाची मर्यादा पाहता राज्याच्या कोपऱ्यात घडत असलेल्या महिला अत्याचाराचा समाचार घेवून त्या दिशेने पाऊल उचलने महत्वाचे ठरते. परंतू, चाकणकरांना स्वत:च अस्तित्व सिद्ध करता येत नसल्याने चित्रा वाघ यांची होणारी वाहवा खुपते ते काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पक्षाने आपल्यावर एवढी मोठी सोपवलेली जबाबदारीचे भान चाकणकरांना राहिले नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत चालली आहे, यामध्ये दुमत नाही. त्यामुळे, पुरोगामी विचार सरणीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चाकणकरांवर समज देणार का?, असा प्रश्न सर्वासामान्य जनतेला पडला आहे.