मुंबई : जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. सरकारने या योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल. https://t.co/AAkrL9Q6T1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2020
रोहित पवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट केले की, जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. त्यामुळे ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.
याआधी रोहित पवार यांनी 9 सप्टेंबरला ट्विट करत या योजनेची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यांनी ट्विट केले होते की, जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. त्यामुळे ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.