मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प नुकताच सादर केला. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर जोरदार टिकास्त्र सोडलं. तर निधी वाटपावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना ५० फोन केलेत. परंतु त्यांनी उचलचेच नाहीत. अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर आता अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निधी वाटपाबाबत अर्थमंत्र्यांना ५० पत्र पाठवली, त्यांच्या स्वीय सहाय्यकांना ५० फोन केलेत. मात्र अर्थमंत्री भेटायला तयार नाहीत. मतदारसंघासाठी निधी मागावा लागतो. परंतु ते मला बंगल्यावरच प्रवेश देत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांकडे सांगितले तर बघतो म्हणून सांगितले. त्यामुळे आता विठोबा रूखमाई पावली तर निधी मिळेल. असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका
दरम्यान, अजित पवारांवर टिका केल्यानंतर अजित पवार गटातील प्रवक्ते, आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, संताजी धनाजीचे घोडे औरंगजेबाच्या सैनिकांनी पाण्यात दिसायचे तसे अजितदादा आव्हाड सोहेबांना दिसत आहे. त्यामुळे त्यांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झाला आहे. डोळे उघडले की सगळंच त्यांना पिवळंच दिसतं. योजना केली तर ती का का नाही ? शेवटी विरोधक आहेत. विरोधच करणार असा टोला देखील अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा..“गरिब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळं लावून काही होणार नाही”
हेही वाचा..विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा
हेही वाचा..महाविकास आघाडीचा नवरदेव कोण ? कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत, भाजपने डिवचलं