पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं करोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड केअर रुग्णायात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यानंतर मीडियाने शासनाला धारेवर धरत पालकमंत्री अजित पवार यांना सवाल विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास नकार दिला. मात्र या सर्व प्रकारावरून नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय म्हणालेत नितेश राणे आपल्या ट्वीटमध्ये
पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला ?
हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला !कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत !
त्या COVID centre चे उदघाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली ! अशा शब्दात नितेश राणे यांनी प्रशासनाच्या गलथान पणावर लक्ष वेधत अनेक ताशेरे ओढले आहेत.
पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला?
हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला!कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत!
त्या COVID centre चे उदघाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली!— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2020