मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपा आमदार राम कदम यांनी कंगना राणौतबाबत केलेल्या वक्तव्यापासून भाजपाने हात झटकले आहेत. तसेच, कंगना राणौतचे समर्थन करणाऱ्या भाजपाने आता यू टर्न घेतला आहे.
आज भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कंगना राणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच, आशिष शेलार यांनी याबाबतची भाजपाची भूमिका स्पष्ट करत, संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार
कंगना राणौत यांनी मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नाही.
मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवणारे कुठलेही वक्तव्य कंगना राणौत यांनी केले असेल किंवा केलेले आहे, त्याच्याशी भाजपाला जोडणे दुर्देवी व चुकीचे आहे.
आम्ही कंगणना राणौत यांच्या वक्तव्याशी असहमत आहोत,”
Read Also
शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाहीhttps://t.co/YfpTVq8NmG
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 4, 2020