मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्यामुळे मागील काही दिवस राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. कंगना मुंबईला येणार असल्याने तिला केंद्र सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देखील पुरवण्यात आली. यावरून आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर सडकून टीका केली आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, कंगना राणावत खोटारडी आहे. खूप जास्त प्रमाणात खोटं बोललं की लक्षात रहात नाही. कंगनाचं तसंच झालंय. ती आत्ता एक बोलते आहे आणि याआधी बरंच बोलून गेली आहे. जे तिच्या लक्षात नाही.
कंगनाच्या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेविषयी मातोंडकर म्हणाल्या की, डमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं?, तुमच्या आमच्यासारखा जो अॅक्ट ऑफ गॉड म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही केला तरी आपल्याला भरावाच लागतो. त्या कंगणाला करदात्यांच्या पैशातून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली ती काय म्हणून दिली गेली होती ?
मुंबई ही महाराष्ट्राची फक्त नाही. महाराष्ट्राने देशासाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये किती प्रश्न आहेत. ते सोडवण्याचे कष्ट कंगनाने घेतले आहेत का? मुंबईने कायमच सगळ्यांना दिलं आहे. जी वाय लेव्हलची सुरक्षा कंगनाला दिली आहे ती टॅक्स पेअरच्या पैशातूनच दिली गेली, असेही त्या म्हणाल्या.