मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईच्या प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारल्यानंतर कंगनानं सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. यावरून न्यायालयाने मुंबई महापालिकेला सुनावलं होतं.
शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात झालेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगन यांच्यामध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. त्यानंतर महापालिकेने कंगनाची ऑफिस हे अवैध बांधकाम असल्याचे सांगत त्यावर कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत दाद मागितली होती.
त्यानंतर न्यायालयाने बीएमसीला फटकारले होते त्यावर आता कंगनाने सत्यमेव जयते असे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे कंगनाची ट्विटर हल्ला अद्याप देखील थांबलेला नाही. कंगना सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर वारंवार टीका करत आहे.
Read Also
मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये अन्यथा ….https://t.co/RK5P8mGCER
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020