मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केला आहे. आता या दाव्यावर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रती दावा करत मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचे म्हटले आहे
The MMRDA will therefore carry on with its work for Metro joint Car Depots at Kanjurmarg as earlier decided.
(2/2)— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 3, 2020
आदित्य यांनी ट्विट करत माहिती दिली की, महसूल नोंदीनुसार कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा एमएमआरडीएला कारशेड डेपो तयार करण्यासाठी दिली आहे. तशी नोंदच महसूल विभागाच्या खात्यात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आली आहे. त्यामुळं या पुढेही एमएमआरडीए याआधी प्रमाणेचं मेट्रो कारशेडचे काम सुरु ठेवणार आहे.
दरम्यान, केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव सचिन कुमार यांना पत्र पाठवून कारशेडच्या जागेवर हक्क सांगितला आहे. केंद्र सरकारने या जागेवर फलक लावल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.