छत्रपती शिवाजी महाराजांचा बेळगावमधील मणगुत्ती गावातील पुतळा हटवल्यावरून राजकीय वातावरण चांगेलच तापले होते. मात्र आता कर्नाटक सरकारने केवळ आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आश्वासन दिले आहे हे. मणगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसून आले.
भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात जागोजागी उमटले आहेत.
दरम्यान, महाराजांचा पुतळा आठ दिवसात बसवला नाही, तर गावकरी नवव्या दिवशी पुतळा बसवणार, असा निर्णय पोलिस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.