मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. यावरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांत जमीन व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक या दोन्ही कुटुंबाच्या नावावर 21 सातबारा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्या यांनी याचे पुरावे देखील दिले आहेत.
उद्धव ठाकरे परिवार आणि अन्वय नाईक परिवारचे एकवीस 7/12, जमीन व्यवहाराचे पुरावे आज प्रसिध्द केले उद्धवजी ठाकरे आपले आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय?
सौ रश्मी ठाकरे आणि सौ मनिषा वायकर या दोघांनी पार्टनरशिप मध्ये या जागा घेतल्या आहेत, वायकर आणि ठाकरे यांची बिझनेस पार्टनरशिप आहे का pic.twitter.com/50AybQef7p— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 12, 2020
जमीन व्यवहाराचे पुरावे सादर करत, उद्धवजी ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंध काय?, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे यांचा जमिनी घ्यायचा आणि विकायचा व्यवसाय आहे का? हा रिअर इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे?, असे प्रश्न देखील सोमय्या यांनी विचारले आहेत. ठाकरे आणि वायकर कुटुंब जमिनींचे व्यवहार का करत आहेत? मित्र किंवा नातेवाईक म्हणून एकत्र आला असाल तर तसं जाहीर करावं, असेही सोमय्या म्हणाले.