मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आरोपांचा धडकाच लावला आहे. आता किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापरकरून कुटुंबियांचा व आपल्या कंपनीचा फायदा करून घेतल्याचा आरोप करणारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
V filed PIL at Highcourt against Mayor Kishori Pednekar for capturing SRA Flats of Slum Dwellers. Petition against Thackeray Sarkar for Frauds ₹12000 Crore 5000 Bed Hospital & ₹900 Crore (₹354 crore paid) Dahisar Land (Builder bought at ₹2.55 Crore) admitted with Lokayukta pic.twitter.com/R2B0XF6xV1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 13, 2020
याआधी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा केला होता. खोट्या कागदपत्रांद्वारे बनावट पद्धतीने या गाळ्यांचा वापर करणे, आर्थिक उत्पन्नाचे साधन बनवणे, झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याचा भंग करून स्वत:चा फायदा करून घेण्याचे काम पेडणेकर यांनी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे म्हणत त्यांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे सरकार हे भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.