चिपळूण : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिले आहे.आमदार जाधव यांनी 2016 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा नियम 293 च्या प्रस्तावाद्वारे कोकण विकासावर चर्चा घडवून आणली. कोकण विकासासाठीचे अनेक मुद्दे त्यांनी मांडले.
वैधानिक विकास महामंडळाचा प्रश्न जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला होता. त्यावर दिलेल्या उत्तरात पवार यांनी म्हटले आहे की, कोकणाकरीता स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा सातत्याने सभागृहात मांडण्यात येतो. कोकणाकरीता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याकरिता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 371(2)(क) मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून आता पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
Read Also
बुलढाण्यातील शेकतकऱ्यांसाठी रोहित पवार करणार मार्गदर्शनhttps://t.co/dNl3jjeO2E@RRPSpeaks @DhoteAniruddha
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 12, 2020