मुंबई : महाराष्ट्रात एक धक्कादायक माहिती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी एम आय एम पक्षाच्या दोन आमदारांनी आपले स्वतःचे लेटरहेड दिल्याचा आरोप भाजप आमदार अतूल भातखळकर यांनी केला आहे. त्याचबरोबर या सार्वभौम आणि राष्ट्रीय सुरक्षेशी खेळणाऱ्या देशविघातक षडयंत्राची कसून चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
MIM च्या आमदारांचा घातक खेळ…
देश विघातक षड्यंत्राची कसून चौकशी झाली पाहिजे… लाचार ठाकरे सरकार हे प्रकरण खणून काढेल काय? pic.twitter.com/Mv8anbhRp6— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व मिळवून देणारी टोळी आज मुंबई पोलिसांनी शोधून त्यांना अटक केली आहे. त्या टोळींकडून एम आय एक च्या दोन आमदारांची सही असलेली लेटरहेड सापडली आहेत. त्यामध्ये मालेगांव एम आय एम चे आमदार मुफ्ती मुहम्मद ईस्माईल आणि माजी आमदार आसिफ शेख यांच्या लेटरहेडचा समावेश आहे.
धक्कादायक…
बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड…
देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धोकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून करा, देशद्रोह्यांना अटक करा… pic.twitter.com/puYj74K4sR— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2020
अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांकडून महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांचे लेटरहेड कसे काय जप्त होतात? हा अतिशय धोकादायक प्रकार असून भारताचा बांगलादेश बनवण्यासाठीचा डाव असल्याचं भाजप आमदार अतूल भातखळकर यांनी सांगितले आहे.
Read Also :
अकरावीचा प्रश्न कधी सुटणार?, राज ठाकरेंचा वर्षा गायकवाडांना फोन https://t.co/8xLWl75e3Y @RajThackeray @mnsadhikrut @SandeepDadarMNS @MNSAmeyaKhopkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020