महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे . गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे . कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे बेड्स , व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत , अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे . त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिक , लघु उद्योजक आणि गरीब वर्गामध्ये यामुळे काहीशी चिंता आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे . यासंदर्भात महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा Anand Mahindra यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “Lockdown is not a viable option,” Anand Mahindra advised the Thackeray government
दरम्यान , काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स , व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत , अशा सूचना देण्यात आल्या . तसेच , मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी , अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या आहेत .
लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे(Anand Mahindra tweeted on the issue of lockdown). ‘ उद्धवजी , समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने गरीब , स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत . मूळ लॉकडाऊन मूलत : रुग्णालये / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते . त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करुया आणि मृत्यू टाळूया ‘ , असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला दिला आहे .या वर सरकारकडून काय प्रतिक्रिया येते या कडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.