काटोल : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान वेगळा आहे मात्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
महाविकास आघाडीने सोयाबीनचे बोगस बियाणे दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच यासाठी सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर इतकी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच कापूस आणि मोसंबीच्याबाबतची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
येत्या पंधरा दिवसांमध्ये जर सरकारने याबाबतचा पंचनामा करून नुकसान भरपाईबाबतची घोषणा न केल्यास भाजपकडून गावागावामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यामध्ये महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण सहभाग घेतील जोपर्यंत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा असल्याचे मत यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
Read Also
आगामी काळात कंगना विधानपरिषदेत किंवा राज्यसभेत दिसल्या तर नवल वाटायला नकोhttps://t.co/T67TW5wiAO@VijayWadettiwar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020