मुंबई : राज्यातील महामारीने बाधित रुग्णांच्या सातत्याने वाढत असणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. तरीही ही वाढ सतत राहिल्याने तो वाढवून १५ मे पर्यंत करण्यात आला. या दरम्यान राज्यातील बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी, रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अजूनही कमी आले नाही.
तसेच, टास्क फोर्सने देशभरात महामारीची तिसरी आणि यापेक्षाही तीव्र लाट लवकरच येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, राज्यातील लॉकडाऊनच्या संदर्भात महत्वाचे सूतोवाच केले आहे.
“राज्यात रोज ५० हजारांच्यावरच नवीन बाधित रुग्ण सापडत आहेत. तसेच, पॉझिटिव्हीटी रेट देखील अजून नियंत्रणात आलेला नाही. मात्र, राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. तरीही परिस्थिती हवी तशी नाही.
यामुळे निर्बंध काढले तर परिस्थिती पुन्हा एकदा आधीसारखी हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मे पर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
यावेळी, राज्य सरकार येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी देखील तयारी करत असल्याचं टोपे यांनी सांगितलं. बेड्स वाढवणं, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी करता सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे.
त्याचसोबत लसीकरणाचा वेग अधिक करण्याच्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्नशील आहोत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read Also :
- पुण्यात उभारलं जाणार देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर; महापालिकेचा निर्णय
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा मृत्यू
- या सरकारचे निर्मातेच बारधार्जिणे, त्यांना फक्त बारचालकांचं वीजबिल दिसतं
- संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना अजून एक पत्र लिहून केली महत्वाची मागणी, म्हणाले…