मुंबई: संपूर्ण देशभरात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असून, कोरोना लसीकरणावर भर दिला जात असला, तरी कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक केंद्रे कोरोना लसींअभावी बंद आहेत. कोरोना महामारीच्या संकटात देशातील जनता भरडून निघत चालली आहे. त्यातच केंद्र सरकार कडून महाराष्ट्रावर अन्याय होत आहे आणि जाणून बुजून कमी मदत होत आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना महामारीच्या संकटात अनेक गोष्टींवरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते . मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चांगली स्थिती असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर केंद्र १ लाख टन ऑक्सिजनची आयात करत आहे, असे आरोग्य सचिवांनी म्हटल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या सविस्तर निवेदन प्रसिद्ध करत केंद्र सरकारवर टीका केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले . महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला, असा हल्लाबोल केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून केला आहे. Maharashtra Front is counting the price of passive leadership of the government; Criticism of Keshav Upadhyay on Mahavikas Aghadi