ठाकरे सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिल्हाबंदी उठवण्यात आली असून आता अंतर राज्य प्रवास करण्यासाठी ई पासची गरज नसल्यचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास परवानगी असेल. परंतू, अद्याप मेट्रो आणि सिनेमा गृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. तसेच शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
‘अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद?
- कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
- राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
- शाळा-कॉलेज मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
- 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
- खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे
- चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
- मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही