मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आंदोलन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता आज या विषयावर पुन्हा चर्चा करीत यावर निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळात त्यांना नोकरी देण्यात येणार आहे. आजच्या मंत्रीमंडळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.