मुंबई : आमचं सरकार पाच वर्षे पुर्ण करतील ऐवढच नाही तर पुढची पाच वर्षे महाविकास आघाडीचच सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल असा अंदाज महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र भाजपमधील अनेक नेते, आमदार हे सरकारनेमध्ये येण्यास ईच्छूक असून त्यांना आता तिकडे भविष्य दिसत नाहीये, अहमदनगर जिल्ह्यात अनेक नेते जे राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. असा गौप्यस्फोटही मंत्री तनपुरे यांनी केला आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप प्रवेश केला होता. आता तीच मंडळी पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल हा नवीन संघर्ष आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरुन होताना आपल्याला दिसत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तर त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
Read Also :