मुंबई : महाराष्ट्रात अनेक आमदार, नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांचे उपचार पंचतारांकित रुग्णालयात झाले मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांनी मात्र सरकारी रुग्णालयातच उपचार सुरु ठेवले असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर हल्ला चढवला आहे.
महाराष्टात सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण झाली असल्याने ते विलगीकरणात आहेत. याआधी अनेक मंत्र्यांना जेव्हा या आजाराची लागण झाली तेव्हा त्यांनी आपले उपचार पंचतारांकित रुग्णालयात केले होते. महाराष्ट्रातील सामान्य जनता सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना मंत्र्यांनी का म्हणून पंचतारांकित रुग्णालयात उपचार घ्यायचे असा सवाल हि त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे. त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.
सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
Read Also :
सोशल मीडियावर दिग्गजांची बदनामी करणं महागात पडणार; सरकारने पोलिसांना दिले कारवाईचे आदेश https://t.co/64GovlUMxU @AslamShaikh_MLA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020