मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहे. मराठा समाजाकडून मशाल मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा काळ मशाल मार्चने गाजण्याची चिन्हे आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या 7 नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मार्च नेला जाणार आहे. अशा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षण ही मोर्चाची महत्त्वाची मागणी असल्याने या अनुषंगाने प्रमुख मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या. मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन सुरक्षित करावेत, या प्रमुख तीन मागण्या करण्यात आल्या.
Read Also :
हे तर धोक्याचे सरकार, एक ‘घोटाळेबाज’ तर दुसरा ‘धोकेबाज’, काँग्रेसचा भाजपवर निशाणा https://t.co/N61sWMxE2i @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020