पुणे : राज्यातील सरकार हे केंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून आलेले आहे त्यामुळे केंद्र सरकारला राज्यातील सत्ता अस्थिर करायची आहे.म्हणून मराठा समाजावर आरक्षणाबाबत अन्याय करण्यात आला आहे असा घणाघात संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी हा आरोप केला आहे. तसेच न्यायालयाने मराठा समाजवर मोठा अन्याय केल्याचे देखील यावेळी प्रतिनिधींनी म्हंटले.
संभाजी ब्रिगेडचे नेमकं काय म्हणणं आहे ?
मराठा समाज अन्याय सहन करणार नाही
तिहेरी तलाक,कलम ३७० रद्द याप्रमाणे मराठा आरक्षणाला न्याय का नाही ?
केंद्र सरकार राम मंदिर,तिहेरी तलाक असे मुद्दे सहजपणे सोडवतय.
सरकार स्थापनेसाठी झालेला राज्यातील भाजप आणि इतर पक्षांमधील संघर्ष यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारला वेगळी वागणूक देत आहे.
मराठा समाजावर जो अन्याय झालाय त्याविरोधात आम्ही न्यायालयाच्या सुद्धा विरोधात जाऊ.
इतर राज्यातील आरक्षणावर बाधा येत नाही मग महाराष्ट्रातच मराठा समाजवर अन्याय का ?
राज्यसरकारने पुन्हा याचिका करून ही स्थगिती उठवायला पाहिजे.
केंद्र सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घ्यावे.
मराठा आरक्षण हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या राजकारणाचा बळी आहे.
राज्यातील सर्व पक्ष आणि केंद्रातील भाजप यांच्या संघर्षाचा मराठा आरक्षण मुद्दा बळी झाला आहे.
येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून न्याय मिळवू
कोणत्याही तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नहे.
विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र येऊन काम करत नाहीये फक्त एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.