पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, आंबेगावातील अनेक भागांत पाणी तुंबलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेगाव भागातील आरोह गार्डन परिसरात आज कात्रज ते नवले पूल या रस्त्याची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चा करून कामाची माहिती घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे पाहणी करून झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पुण्याचे महापौर मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर निशाणा साधला, त्याला आता पुण्याच्या महापौरांनीही प्रत्युत्तर दिलं आहे
गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. किंबहुना पुणे महापालिका चांगलं काम करत आहे, असंही महापौर मुरलीधरजी मोहोळ म्हणाले होते. कमी नुकसान झालं असून, पाणी कमी ठिकाणी तुंबलेलं आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, असं आवाहनही महापौरांनी केलं आहे. नैसर्गिक आपत्तीत कोणीही राजकारण आणता काम नये, असंही महापौर म्हणाले आहेत.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला या पावसानं झोडपलं. सगळीकडेच असा प्रकार झाला आहे, त्यामुळे पुण्यात काही वेगळं झालं, असं म्हणता येणार नाही. या महापालिकेचा भोंगळ कारभार असल्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आरोप केले. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून पुणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. असं असताना भाजपाच्या सत्तेच्या काळात असं घडलं, असं म्हणता येणार नाही. कात्रज, धनकवडी आणि आंबेलोढ्यात राष्ट्रवादीचेच महापौर झाले. यांचेच स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हजारो आणि शेकडो कोटी जर विकासकामांसाठी या लोकांनी नेले तर आता या परिस्थितीची नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रतिप्रश्नही पुण्याच्या महापौरांनी उपस्थित केला आहे.
Read Also
*महाविकास आघाडी सरकारमधील 'या' मंत्र्याला पोलीस मारहाणप्रकरणी ३ महिन्यांची शिक्षा*https://t.co/EaYTEEg3j3#MahavikasAaghadi #Shivsena #NCP #Congress
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020