मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडचे कोविड परिस्थितीबाबत एक सभा घेतली. त्यात पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलायलं लावलं होतं. मी आपलं आयपीएल मॅचसाऱखं बघत होतो. मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. त्यावेळी त्यांनी महागाईवर एक उपाय सांगितला की, पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा. तुम्हाला मुंबई फक्त ओरबडण्यासाठी पाहिजे आहे. असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
ज्या ज्यावेळी मुंबईवर कोणती आपत्ती येते त्यावेळी पहिल्यांदा शिवसेना धावून जातो. अनेकदा भाजपकडून सामानामधील घटनांवर टिका केली जाते. मात्र सामानामध्ये जे काही येतं ते हिंदुस्थानतील जनतेच्या हितासाठी येतं आणि ते येणारच.
तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं. की याला केंद्राची सुरक्षा असताना याच्यावर हल्ला झाला कसा? त्यासाठी सुरक्षा तुमची होती. त्याला विचारा. ती स्वासची बाटली दिली कोणी विचारा त्यांना, असं खडेबोल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं. आम्ही संयम बाळगतो म्हणजे नामर्दांची औलाद नाही. एक तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पंरतु कोणी अंगावर आलं तर त्याला सोडत नाही. हे आमचं हिंदुत्व आहे, हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुंबई तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो मर्द मराठा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ते अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएसचं स्वांतत्र्य लढ्यात कुठेही दिसली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी जो लढा सुरू होता. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील तुम्ही कुठे होता. ? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात यांचे बाप म्हणजे जनसंघ फुटला होता. त्यामुळे मुंबईचे जे काही लचके तोडण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध रहा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, आणि मराठी आमचा प्राण आहे. आमचे जुने फोटो तुमच्यासोबतचे व्हायरल होत आहेत. ते हिंदुत्व आम्ही आता सोडलं आहे. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. गाढवासमोर वाचली गिता , कालचा गोंधळ बरा होता. असंही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.