मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेली राजकीय आँफर सध्या राज्यात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवल्याने एमआयएम पक्षावर टीका होऊ नये, म्हणून मी महाविकास आघाडी सरकारला युतीचे संकेत देत आहे. तसेच तिन चाकी रिक्षाला एक चाक अजून बसवल़ं तर चार चाकी मस्त चालेल, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यानंतर युतीचे हे संकेत शिवसेनेने झुगारून लावले. मात्र अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
एमआयएम पक्षावर नेहमी भाजपची ब टिम असल्याचा आरोप केला जात आहे. देशात एव्हाना राज्यात देखील अन्य राजकीय पक्ष यावर टीका करीत आहे. अशातच आता एमआयएमनं अगोदर भाजपची ब टिम नाही आहे हे सिद्ध करून दाखवावं,असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानंतर त्यांचं सांत्वन करण्यासाठी राजेंश टोपे हे इम्तियाज जलील यांच्या घरी गेले होते. अशा वेळी राजकीय चर्चा करणं योग्य नाही. त्याचबरोबर कुणाच्या घरी निधन झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या घरी जाते. परंतु तिथं राजकीय चर्चा होत नाही ही राष्ट्रवादीची संस्कृती आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणं आवश्यक वाकत नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय हा एमआयएममुळे झाला असल्याचा आरोप भविष्यात कुणी लावू नये म्हणून मी राज्यात युती करण्याचा प्रस्ताव ठेवतोय, असं जलील यांनी म्हटलं. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी समोर युतीचा प्रस्ताव ठेवतोय असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात एकच गोंधळ उडाला.