पुणे : मागच्या २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र भाजपला यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. यातच आता भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातच आज एनडीएची महत्वाची बैठक पार पडली. यात नरेंद्र मोदी यांची एनडीएच नेतेपदी निवड करण्यात आली. त्याआधी काही एनडीएच्या नेत्यांनी भाजपकडे काही अटी घातल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही अट घातलेलीय नाहीय. यावरून शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी शिंदेंना डिवचलं आहे.
हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद
एनडीएमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची महत्वाची भूमिका राहिलीय. त्यांनी आपल्या राज्यांसाठी विशेष दर्जाची मागणी केलीय. त्यावरून अहंकारात आणि व्यक्तिपुजेत बुडालेल्या भाजपला जनतेने यंदा आरसा दाखवणारा कौल दिला म्हणूनच नाईलाजाने का असेना भाजप नेते आता “मोदी सरकार” ऐवजी “एनडीए सरकार” म्हणत आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
तर एनडीएतील JDU ,TDP यांसारखे पक्ष आपापल्या राज्यासाठी विशेष धोरणात्मक सवलतींच्या अटीवर सत्तेत सहभागी होत आहेत. परंतु महाराष्ट्रातील एनडीएचा मुख्य घटक पक्ष असलेल्या शिंदे साहेबांनी महाराष्ट्रासाठी कुठलीही विशेष मागणी केलेली दिसत नाही. कदाचित भूतकाळात अपेक्षेपेक्षा जास्त पदरात पडलं असल्याने आता महाराष्ट्रासाठी काही मागण्याची हिम्मत त्यांच्यात नसावी. असो महाराष्ट्रासाठी काय मागावे हे सुचत नसेल तर बिनशर्त पाठिंबा दिलेल्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील काही मागण्या तरी मान्य करवून घ्याव्यात. असं म्हणत रोहित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर
हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले..
हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा
हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ