सोलापूर : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजकीय पक्षाचे नेते देखील विविध भागांचा दौरा करत नुकसानीची पाहणी करत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सोलापूरातील मोहाळ तालुक्याचा दौरा करत नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी हे आपल्या मतदारसंघातून गायब असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे.
भिमा नदी काठावरील शेतकऱ्यांची ज्या तीव्रतेन नुकसान झाले आहे त्याच तीव्रतेने त्यांचे पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी शेतकरी कुटुंबाला दिले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने फळबागांचे नुकसान झाले आहे त्याच्या नोंदी व्यवस्थितपणे घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या, पडलेले विजेचे पोल, बंद पडलेले डीपी खंडीत असलेला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा अशा सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
मोहोळ तालुक्यातील या बाधित गावात खासदार स्वामी किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी देखील आलेला नाही, अशी नाराजी यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.