सोलापूर: सध्या पाण्याच्या प्रश्नावरून आता अख्खा महाराष्ट्र पेटलेला सध्या दिसत आहे. कुकडी पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाचा चा पाणी प्रश्न हे विषय सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत. पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्या विरोधात सोलापुरातील आमदारांनी पाणी प्रश्नी मोट बांधली आहे. उजनी च्या पाणी प्रश्नावरून इंदापूर तालुका विरुद्ध सोलापूर असा संघर्ष बघायला मिळत आहे. आता भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उजनीच्या धरणाच्या पाण्याच्या बाबतीत आक्रमक भूमिका मांडली आहे. MLA Ranjit Singh Mohite Patil’s direct correspondence to Chief Minister Uddhav Thackeray regarding water allocation of Ujani Dam
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयातील हक्काच्या पाण्यापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी उजनी जलाशयाच्या उर्ध्वबाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे नवीन मुठा कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करावे. उजनी जलाशयाच्या बाबतीत राजकारण न करता शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करत केली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आयोजित पत्रकारपरिषदे मध्ये उजनी धरणाची सध्य परिस्थिती आणि त्याचा वापर कसा करावा याचा आढावा घेतला आहे. आमदार मोहिते पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray , उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व संबंधित खात्याचे राज्यमंत्री यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. शासनाने पाण्याचे राजकारण न करता कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी व सर्व गोष्टींचा गांभीर्यपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा असे देखील मोहिते पाटील पत्रात म्हटले आहे.