मुंबई – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे चर्चेला वादळातच सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडागंजी पाहायला मिळत आहे.
बडनेराचे आमदार रवी राणी गळ्यात संत्र्यांचा हार घालून विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं. गळ्यातील संत्र्यांचा हार काढल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. काल ‘शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार’, असं लिहिलेलं बॅनरचा पोषाख परिधान करून आमदार रवी राणा यांनी सभागृहात प्रवेश केला. यावरून सभागृहात वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एवढंच नाही तर त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेशही दिले.