कर्जत : केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदी विरोधात राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांकडून रस्त्यावर उतरत विरोधप्रदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विरेश आंधळकर या शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटकरत राज्यपालांना शेतकरी पुत्रांना भेट देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे म्हणून शेतकरी पुत्र पुढे आले आहेत. केंद्र आणि राज्याचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या संदर्भात सोलापुरातील युवा शेतकरी विरेश आंधळकरने इमेलद्वारे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते, अभिनेत्री कंगना राणावत तसेच इतर बड्या व्यक्तींना वेळ देणारे राज्यपाल कष्टकरी शेतकऱ्याच्या पुत्रांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे रोहित पवार यांनी ट्विट करत ‘ महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास असल्याचं म्हंटल आहे.
महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास आहे. https://t.co/9adjcwj7yg
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2020
Read Also
१२ दिवसांनी मराठा आरक्षणावर पर्याय सुचला,पुढे काय वाट लावतील…https://t.co/bOHxyaG6AO#MarathaReservation #NileshRane #Mahavikasaaghadi@meNeeleshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 21, 2020