मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसेतसेच राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेचा टाईमपास टोळी असा उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
आदित्य ठाकरे यांनी टाईमपास टोळी असा उल्लेख केल्यानंतर आता मनसे नेत्यांकडून शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात, असा जोरदार टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लगावला आहे
"औरंगाबादचं नामांतर 'संभाजीनगर' करू" यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली…
याला म्हणतात, टाइमपास!@AUThackeray— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) February 4, 2021
याआधी मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी देखील आदित्य ठाकरेंना जोरदार उत्तर देत टाईमपास कशाला म्हणतात ते सांगितले. “औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने 30 वर्षं घालवली. “मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ” असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाइमपास!, असे जोरदार उत्तर शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी ‘मनसे ही संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे’, असे म्हटले होते.