मनसे नेते अविनाश जाधव यांना वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आले होते. अखेर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तरीही शेवटी सत्याचा विजय झाला. असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला घाबरणार नाहीत.
अविनाश जाधव म्हणाले की, ठाण्यातील जे राजकीय नेते मला अडकविण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला काय संपवायचं आहे ते संपवा. पण अडीशचे मुलींचं कुटुंब उद्ध्वस्त करु नका.
ठाण्यात गुन्हाच घडला नाही. ठाण्याबाबत जो व्हिडीओ आज कोर्टाला मी दाखवला त्यात पूर्णपणे स्पष्ट होतंय की, हा गुन्हा खोटा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.