मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. कोरोनारुग्णांना उपचार, औषधासाठी रुग्णांना भटकावे लागत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये गेली काही दिवसांपासून वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दोन्ही सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये जनतेचे नुकसान होत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून लस, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर औषधाच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले होते. याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी टीका केली आहे.
जुनी म्हणं आहे भीक नको पण कुत्र आवर आता म्हणावंस वाटतंय लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या
blame game मध्ये जनतेचाच game होतोय. दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे. असो, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 1, 2021
जुनी म्हणं आहे भीक नको पण कुत्र आवर. आता म्हणावंस वाटतंय लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या ब्लेम गेममध्ये जनतेचाच गेम होतोय, असा आरोप संदीप देशपांडे यांनी ट्विट करत केला आहे.
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंना लगावतानाच देशपांडे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.