मुंबई : कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. अनेक लसीकरण केंद्र लस नसल्याने बंद करण्याची वेळ आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आकडेवारीवरून जुंपली आहे. यातच आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कधी कधी हक्काचे मागून मिळाले नाही, तर ते लढा देऊन मिळवायचे असते, अशा शब्दात थेट इशाराच दिला आहे.
राजू पाटील ट्विट करत म्हणाले की, सीरम इंस्टिट्यूट पुण्यातच आहे व व येथूनच देशभर वितरण होत आहे आणि जर खरोखरच महाराष्ट्राला लस मिळण्यात राजकारण होत असेल तर …! कधी कधी हक्काचे मागून मिळाले नाही, तर ते लढा देऊन मिळवायचे असते. नाक दाबले की तोंड आपोआपच उघडेल, फक्त हिम्मत पाहिजे, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी केंद्राला दिला आहे.
serum institute पुण्यातच आहे व येथूनच देशभर वितरण होत आहे. आणि जर खरोखरच महाराष्ट्राला लस मिळण्यात राजकारण होत असेल तर ……….! कधी कधी हक्काचे मागून मिळाले नाही, तर ते लढा देऊन मिळवायचे असते.नाक दाबले की तोंड आपोआपच उघडेल, फक्त हिम्मत पाहिजे.@OfficeofUT
#Maharashtra_First— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 8, 2021
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने केंद्राकडे लसीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लसींच्या पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप टोपेंनी केला आहे.
दुसरीकडे, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने लसीचे ५ लाख डोस वाय घालवले, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला.