मुंबई : मनसेने केलेल्या कायदाभंग आंदोलनावरून कर्जत पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चौघांवर कलम १०७ अंतर्गत कारवाई केली आहे . यावर कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात सुनावणी झाली . यानंतर मनसेचे सरचिटणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केले होते. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय’ असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
‘सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का माहिती नाही. पण हाय कोर्टाने कान टोचले आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी सुधारलं पाहिजे. लोकांची उपासमारी होत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज तीच गोष्ट हाय कोर्टाने म्हटली आहे. सरकार घरी बसून जबाबादरी सांभाळत आहे , असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
Read Also :
मुंबईत गुंडाराज ! अभिनेत्री कंगनाचा पुन्हा CM ठाकरेंवर हल्लाबोलhttps://t.co/kzEKpq18AU#KanganaRanaut #Shivsena #Uddhavthackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020