मुंबई : मोदी’जी तुम्ही आमच्यावर एफआयआर दाखल करू शकता, आम्हाला अटक करू शकता, पोस्टर फाडू शकता, परंतू आम्हाला प्रश्न विचारण्यापासून रोखू शकत नाहीत. आमचा आवाज तुम्ही कसे बंद करणार?, देशातील १३० करोड जनतेच्या मनातला प्रश्न आहे, “मोदी जी, हमारे बच्चोंके वैक्सीन विदेश क्यों भेज दिये?”, याचे उत्तर भाजपला द्यावेच लागेल, असे म्हणत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाना साधला आहे.
हमपर एफआईआर दर्ज करोगे
हमें गिरफ्तार करोगे
पोस्टर फाड़ दोगे
हमें प्रश्न पूछने से कैसे रोकोगे?
हमारी आवाज बंद कैसे करोगे?
१३० करोड़ जनता के मन में प्रश्न है
" मोदी जी, हमारे बच्चोंके वैक्सीन विदेश क्यों भेज दिये?"
१३० करोड़ लोगों की आवाज कैसे दबाओगे?
भाजपाको जवाब देना ही होगा ! pic.twitter.com/1CKp40HcHL— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 20, 2021
जगातील सर्व देशांबरोबरच भारतातही करोना संकट गंभीर आहे. जानेवारी २०२१ मध्ये सीरमकडे लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होता. त्या बळावर देशातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्याच दरम्यान देशात आढळणाऱ्या नव्या करोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे देशातील साथ आटोक्यात आल्याचा समज आरोग्य तज्ज्ञांसह सर्वानी करून घेतला होता. मात्र, जगातील काही देशांमध्ये त्यावेळी करोना महासाथीचे संकट अत्यंत गंभीर होते. संकटकाळात परस्परांना मदत करण्याचे देशाचे धोरण आहे. त्याचा उपयोग वेळोवेळी इतर देशांना तसेच भारतालाही झाला आहे.
या धोरणाचा भाग म्हणून सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये तयार होणारी लस विदेशात पाठवण्यात आली. त्यामुळे, त्यानंतर भारतातील कोरोनाचे संकट गडद झाल्याने तात्काळ लसीकरण करणे गरजेचे असताना भारतात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहेत. आमच्यावर एफआयआर दाखल करू शकता, आम्हाला अटक करू शकता, परंतू आम्हाला प्रश्न विचारण्यापासून रोखू शकत नाहीत. “मोदी जी, हमारे बच्चोंके वैक्सीन विदेश क्यों भेज दिये?”, याचे उत्तर भाजपला द्यावेच लागेल, असे म्हणत काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोदींवर निशाना साधला आहे.