नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा कारभार स्विकारला. रविवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात तब्बल ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी गोपिनियतेची शपथ दिली. त्यानंतर आज सकाळीच मंत्रीमंडळाची बैठक बोलवण्यात आली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्याद दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी पहिल्याद दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे. दोन हजार रूपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जमा झाला आहे. एकूण ९.३ कोटी शेतकऱ्यांना २०००० कोटी रूपयांचा हप्ता देण्यात आला आहे.
हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं
दरम्यान, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता नरेंद्र मोदी २ सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रूपये मदत दिली जाते. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. राज्य सरकारकडूनही सहा हजार रूपये दिले जातात. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला बारा हजार रूपये जमा होतील.
READ ALSO :
हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट
हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान