सातारा : काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली कोल्हापूरच्या छत्रपतींनी तर थेटपणे आपली भूमिका मांडत मराठा समाजावर अन्याय झाल्याची भावना ट्विटरवरून व्यक्त केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, यावर कोणतीच भुमिका व्यक्त केलेली नाही.
मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने मोर्चे काढले. आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यानंतर आरक्षण लागू झाले. उच्च न्यायालयातही आरक्षण टिकले. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र, यावरील सुनावणीत अंतिरम स्थगिती देत हा मुद्दा घटनापीठाकडे वर्ग केला आहे. आता सरकारला घटनापीठाकडे आपली बाजू आणखी सक्षमपणे मांडावी लागणार आहे.
मराठा क्रांती मोर्चात आग्रही भुमिका घेणारे उदयनराजे गप्प का ? अशी जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे. त्यांनी आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा समस्त सातारकरांतून व्यक्त होऊ लागली आहे.
या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अपेक्षा आहे
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 9, 2020
Read also
एक मराठा लाख मराठा म्हणत आरक्षणासाठी लातूरमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नhttps://t.co/JMSMdhzc6w
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020