कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट नाकारल्याने राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर महापालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेची महासभा रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे हे राजकारण असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलाय. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेची महासभा रद्द करणे मी समजू शकतो, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारली या कारणामुळे सभा रद्द करत असल्याचा उल्लेख करणे, हे राजकारण आहे. या प्रकारामुळे नाराज असल्याचे संभाजीराजेंनी पत्राद्वारे पालिकेला कळवले आहे. मी गेल्या 14 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढ्यात सक्रीय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हा माझ्यासाठी राजकारणापलीकडील विषय असून नक्कीच यश येणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
Read Also :
“शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असत”https://t.co/K09XwjkvAk#SharadPawar #NCP #BJP @TawdeVinod #VinodTawade
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020