खासदार उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर आहे. कुणीही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करु नये, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी देखील राज्यसभेत शिवाजी महाराजांच्या घोषणांवरील आक्षेपावर भाष्य केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही.”
“सहकारी कारखान्यांना जी मदत लागेल ती राज्य सरकार देत आहे. कारखान्यांना राज्य सरकार हमी देखील देणार आहे. यावर्षी देखील साखर कारखान्यांचं गाळप चांगलं होईल. साधारण महाराष्ट्रात 35 कारखाने आहेत. यापैकी ज्यांना मदत गरजेची आहे त्यांना राज्य सरकार मदत करेल,” असंही जयंत पाटील म्हणाले.