राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही महिन्यांपूर्वी सेल्फी विथ खड्डा हे आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः सत्तेत आहे. त्यामुळे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्वीटी करत सुळे यांना टोला लगावला आहे.
उन्मेष पाटील यांनी सुप्रिया सुळे खड्ड्यासोबत सेल्फी काढतानाचा फोटो ट्विटरवर टाकत राज्यातील खड्डे संपले की काय ? कारण ताई अजून बाहेर पडल्या नाहीत अशा प्रकारचे कॅप्शन देऊन ताई “सेल्फी विथ खड्डे “कार्यक्रम कधी पासून सुरू करायचा ?? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर चांगल्याच ऍक्टिव्ह असतात अनेकदा अवती भोवती दिसणाऱ्या अनेक गोष्टी त्या आपल्या कॅमेऱ्यात कैद करून त्यावर भाष्य करत असतात. मात्र उन्मेष पाटील यांच्या या प्रश्नाला आता सुप्रिया सुळे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील सगळे खड्डे संपले की काय?
ह्या ताई अजूनही बाहेर पडल्या नाहीत म्हणून म्हटले…@supriya_sule ताई"सेल्फी विथ खड्डे "कार्यक्रम कधी पासून सुरू करायचा?? pic.twitter.com/6tRyVbV88M
— Unmesh Patil (@UnmeshPatilBjp) August 21, 2020