मुंबई : सरकार स्थापनेच्या आधीच अग्निवीर योजनेला विरोध झाला आहे. उद्या इतर योजनांनाही ते विरोध करू शकतील. चंद्राबाबू नायडू हे मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. आता मोदी काय करतील ? असा सवाल करत हे सरकार चालवाताना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येतील, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी इशारा दिलाय.
हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
गच्या २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र भाजपला यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. यातच आता भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातच आज एनडीएची महत्वाची बैठक पार पडली. यात नरेंद्र मोदी यांची एनडीएच नेतेपदी निवड करण्यात आली. त्याआधी काही एनडीएच्या नेत्यांनी भाजपकडे काही अटी घातल्या आहेत.
हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज भाजपप्रणित एनडीए आघाडीची संसदेच्या सभागृहात एक बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीचे नेते पदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व एनडीएच्या नेत्यांचे नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर
हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले..
हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा