मुंबई : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीचा आज निकाल लागत आहेत. या निवडणुकांमध्ये महायुतीने सर्वात जास्त जिंकत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. २३५९ ग्रामपंचायती निवडणुकीच्या निकालमध्ये सर्वात जास्त भाजपने ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला आहे.
बारातमी मतदारसंघात सर्व ७ ग्रामपंचायतीवर अजित पवार यांची सत्ता आली असून शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. भोंडवे वाडी म्हसोबा नगर पवाईमाळ या तिन्ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आली आहे. यातच आतापर्यंत अजित पवार गटाच्या ताब्यात ८३ ग्रामपंचातीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती लागले आहेत. आतापर्यंत २३७९ ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ३९७ ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागला आहे. यामध्ये भाजपला ९८, शिंदे गट ६५, ठाकरे गट २९,काॅंग्रेस ३२, शरद पवार गट २९ आणि अजित पवार गट ८३ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.